Mumbai

तर दारूचे दुकाने होतील बंद..राजेश टोपे

तर दारूचे दुकाने होतील बंद..राजेश टोपे

मुंबई राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्रीचा कर्फ्यु लावण्याचां निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉन वाढताना दिसत आहे. दररोज हजारोंच्या संख्येत रुग्ण सापडत असल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक विधान केलं आहे. जर दारूच्या दुकानात गर्दी केली तर दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे राजेश टोपे यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. तसेच गर्दी करू नका, नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील त्यांनी केलं आहे.मंदिरामध्ये जर गर्दी केली तर टप्प्या टप्प्याने त्याबाबत देखील निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करन गरजेचं आहे. जालना येथे बोलताना राजेश टोपे यांनी अजून कडक निर्बंध लावले जाण्याचे विधान केलं आहे.राज्यामध्ये बार आणि देशी दारुच्या दुकानावर गर्दी होत असेल ही दुकाने देखील बंद करावी लागतील, असा सूचक इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना दिला आहे. राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बध आज रात्री पासून राज्यामध्ये लागू होणार असल्याचे ही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले आहे. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाही.
तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाही असेही त्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले आहे. शाळा, महाविद्यालय बंद मात्र दारुची दुकाने सुरु असल्याने विरोधक टीका करतांना बघायला मिळत आहेत. त्यावर बोलताना टोपे यांनी दारूच्या दुकानांमुळे जर गर्दी होत असेल तर दारुची दुकाने देखील बंद करावी लागणार आहे, असा सूचक इशारा टोपे यांनी दिला आहे. त्याचबरोबर लग्न समारंभ आणि धार्मिक स्थळांमध्ये देखील गर्दी होत असेल 50 पेक्षा जास्त लोक आढळून येत असेल तर त्याबाबत देखील लवकरच टप्प्याटप्याने निर्णय घेण्यात येईल, असे टोपे यांनी यावेळी म्हटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button