Mumbai

समीर वानखेडे ना तुरुंगात टाकणार..!नबाब मलिक..तुमचे ऑस्ट्रेलिया कनेक्शन काढू का म्हणत जास्मिन वानखेडेचा पलटवार..!

समीर वानखेडे ना तुरुंगात टाकणार..!नबाब मलिक..तुमचे ऑस्ट्रेलिया कनेक्शन काढू का म्हणत जास्मिन वानखेडेचा पलटवार..!

एनसीबी आधिकारी समीर वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात टाकणार असल्याचं जाहीर आव्हान अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी दिलं आहे. पुण्याच्या मावळमध्ये अल्पसंख्याक विभाग कार्यकर्ता मेळाव्यात नवाब मलिक बोलत होते. यावेळी मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर आणि भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडलं. समीर वानखेडे यांनी कुणाच्या सांगण्यावरुन कारवाई केली? असा सवालही उपस्थित केलाय. पुण्यातील सभेत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, ‘समीर वानखेडेंना आव्हान देतो. वर्षभरात नोकरी जाईल. तुरुंगवास निश्चित आहे. राज्याची जनता सध्या सुरु असलेलं सर्व पाहत आहे. समीर वानखेडेंची बोगसगिरी जनतेसमोर आणणार. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करुन यात माझं काही नाही, असं म्हणाले. मग कुणाच्या सांगण्यावरुन कारवाई केली? उत्तर द्या. मी कुणालाही घाबरत नाही. समीर वानखेडेंना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही.’

समीर वानखेडे प्रसिद्धसाठी लोकांना अडकवण्याचे काम करत आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या घरी मीडिया घेऊन का गेले? चित्रपट सृष्टीला बदनाम करण्याचा हा डाव आहे. यात वानखेडे भाजप वाल्यांचा म्होरक्या आहे. बोगसगिरी करतोय, त्यामुळेच या बोगस केसेस आहेत. हे कोर्टात टिकणार नाहीत. येणाऱ्या काळात मी आणखी पुरावे सादर करणार आहे. या संदर्भात चालणारी तोडपाणी ही मालदीव आणि दुबईत चालते हे आम्हाला समजलंय. ही तोडपाणी थांबली पाहिजे, असेही नवाब मलिक म्हणाले.

मंत्री नवाब मलिक आणि जास्मिन वानखेडे यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. नवाब मलिक यांनी पुन्हा समीर वानखेडे आणि जास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. करोना काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान, मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते याचे पुरावे देखील नवाब मलिक यांनी सादर केले आहेत. यावरून जास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिक यांना इशारा दिला आहे.

मी नवाब मलिक यांचं ऑस्ट्रेलिया कनेक्शन काढू का, असा इशारा जास्मिन वानखेडे यांनी दिलाय. मात्र, ऑस्ट्रेलिया वर आता जास्त बोलणार नाही वेळ आली की नक्की बोलेन, असं त्या म्हणाल्या. तसेच ऑस्ट्रेलियाबद्दल नवाब मलिक यांना विचारा ते सांगतील, असंही यास्मिन यांनी म्हटलं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button