शहापूर

आसनगांव येथे गृहप्रवेश निमित्ताने रंगले कवी संमेलन

आसनगांव येथे गृहप्रवेश निमित्ताने रंगले कवी संमेलन

शहापूर प्रतिनिधी मिलिंद जाधव

शहापूर तालुक्यातील आसनगांव येथे राहणारे संजय रोकडे यांच्या गृहप्रवेश निमित्ताने कवींना आपले विचार कवितेच्या माध्यमातून मांडता यावे म्हणून आगळ्यावेगळ्या कवी संमेलनाचे आयोजन दिनांक १० नोव्हेंबर २०१९ रोजी राठी ओशो धारापार्क चॅम्स कॉम्प्लेक्स शेजारी आसनगांव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी उठाव साहित्य मंच अध्यक्ष कवी विवेक मोरे उपस्थित होते. कविता ही माणसाच्या मनाला नेहमीच भिडते. म्हणून कवितेतून नागरिकांचे प्रबोधन व्हावे म्हणून या कवी संमेलनाचे आयोजन रोकडे परिवाराच्या गृहप्रवेश निमित्ताने करण्यात आले होते. असे संजय रोकडे यांनी बोलतांना सांगितले.

यावेळी कवी विवेक मोरे, जेष्ठ कवी बबन सरोदे, विलास बसवंत,जगदेव भटू, नवनाथ रणखांबे, मनिषा मेश्राम,संघरत्न घनघाव, मिलिंद जाधव, बाळासाहेब जोंधळे, विकास भंडारे, देवभाऊ उबाळे, दिलीप थोरात, अशोक डोळस,यांनी विविध विषयांवर स्वरचित कविता यावेळी सादर केल्या.कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजय रोकडे यांनी तर सूत्रसंचालन युवा कवी मिलिंद जाधव यांनी केले.

Leave a Reply

Back to top button