रामेश्वर खुर्द या ठिकाणी अतिवृष्टी पावसामुळे मातीचे घर झाले जमिन दोस्त
रामेश्वर खुर्द : या गावामध्ये जास्त अतिवृष्टी पावसामुळे, आज सकाळी मातीचे घर कोसळले आहे. कारण भरपूर पाऊस झाल्यामुळे घरावरची जी माती असते. ती माती जास्त दिवस असल्यामुळे ढाब्यावर पकड करून राहत नाही. आणि ती माती भरपूर दिवस उजाड पडल्यामुळे मातीत ताकद राहत नाही. त्यामुळे जास्त पाऊस जिरवू शकत नाही. आणि मणून घर कोसळले जात.परंतु कोणत्याही प्रकाराची जिवीत हाणी झाली नाही. परंतु त्या गरीब लोकांच्या डोकावरचे छत उडून गेले.मणुन शासकीय अधिकारी यांनी त्याची सखोल चौकशी करून, पाहणी करून लवकरात लवकर पंचनामा करण्यात यावे. आणि त्याची परिस्थिती नुसार त्यांना आर्थिक मदत मदत करण्यात यांव.घर मालक, अभिमन रतन वंजारी. हे घर मालक अतिशय गरीब परिस्थिती मधून आपला परिवाराची जेमतेम निर्वाह करत आहे. आणि आता त्याना कुठे राहायच आणि कुठे जायचा असा मनाला लागणारा ठोस प्रश्नन पडलेला आहे. मणुन असे गरीब, कष्टाळू, होतकरू लोकांना लवकरात लवकर न्हाय मिळावं