Jalgaon

पोखरी आणि पोखरी तांडा ग्रामवसियांची तृष्णा भागली.

पोखरी आणि पोखरी तांडा ग्रामवसियांची तृष्णा भागली.

जळगांव : पोखरी आणि पोखरी तांडा या गावात मागील बऱ्याच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या उद्भवलेली होती. ग्रामवासी शेतातील पाणी हंड्यात भरून स्वतः डोक्यावर वाहत घरी आणत होते.हे पाणी खाजगी विहीर आणि खाजगी बोअरवेल मधून आणत असत. पाणी लांब अंतरावरून आणत असल्यामुळे दिवसाचा बराच वेळ पाणी वाहण्यात जात असे.म्हणून रोजगाराची देखील समस्या निर्माण झाली होती.
वर्ल्ड व्हिजन इंडिया मागील दोन वर्षांपासून या गावांमधे गरीब कुटुंबांतील मुलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कार्यक्रम हाती घेवून राबवत आहे. मुलांच्या आरोग्यासाठी विविध कार्यक्रम जसे, पोषण आहार, मुलांची सुरक्षा विषयी जनजागृती, महिला सबलीकणासाठी आणि कोविड १९ विषयी जनजागृती अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाद्वारे शासानासोबत मिळून कार्य करत आहे.
पोखरी आणि तांडा आणि पोखरी येथील पिण्याच्या पाण्याची समस्या जाणून ग्रामवासी यांच्या विनंती अनुसार वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेमार्फत दोन बोअरवेल करून देण्यात आले. या बोअरवेल द्वारे पोखरी आणि पोखरी तांडा येथील ३२५ कुटुंबांना पिण्याचा लाभ झाला.
माननीय श्री गुलाबराव पाटील राज्यमंत्री, पाणी पुरवठा तथा स्वष्छता, महाराष्ट्र राज्य, यांचे सुपुत्र माननीय प्रतापभाऊ पाटील जी. प. सदस्य, जळगाव यांच्या शुभ हस्ते बोअरवेल कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात श्री मुकुंद नन्नवरे माजी सभापती पं. स. धरणगाव, उत्तम पाटील, संजय पाटील, गोकुळ पाटील, नवल पारधी, किसन राठोड, वर्ल्ड व्हिजन इंडिया, धरणगाव मॅनेजर अनिल बल्लुरकर, संस्थेच्या वतीने विजय राऊत, अश्विनी रॉबर्ट, आंकिता मेश्राम आदी मान्यवर आणि ग्रमवासी उपस्थित होते.
या बोअरवेल कार्यक्रमासाठी तालुक्याचे तहसीलदार मा. नितीन कुमार देवरे साहेब, नायब तहसीलदार मा. सातपुते साहेब व श्री प्रथमेश मोहोड साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button