Maharashtra

कोरोना वायरस मुळे घाबरून न जाता,त्यांवर मात करण्यासाठी आरोग्याची काळजी घ्या,संस्थापक श्री.देवा तांबे यांचे नागरिकांना आवाहन

प्रतिनिधी देवा तांबे

कोरोना वायरस मुळे घाबरून न जाता,त्यांवर मात करण्यासाठी आरोग्याची काळजी घ्या,संस्थापक श्री.देवा तांबे यांचे नागरिकांना आवाहन

सध्या कोरोना वायरस हें संपूर्ण जगासमोर राष्ट्रीय आपत्ती म्हणून प्रश्नचिन्ह आहे.
चीनमधून सुरू झालेल्या कोरोना वायरसचा संसर्ग आता जगभरातल्या 203 देशा-प्रांतांमध्ये पोहोचला आहे. तर जगभरात सुमारे 7 लाख लोकांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून मृतांचा आकडा 33 हजारपेक्षा जास्त झाला आहे.
या व्हायरसचे सगळ्यात जास्त रुग्ण सध्या अमेरिकेत आढळले आहेत, त्यापाठोपाठ इटली, चीन आणि स्पेनमध्ये बाधितांची संख्या जास्त आहे.
भारतातही 30 जानेवारी रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत 1200 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 32 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
हा आकडा वाढताच असल्यामुळे सध्या संपूर्ण देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे, तसंच आरोग्य व्यवस्था वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सरकार करत आहेत. यामुळे कोरोना च्या भीती सोबतच बऱ्याच ठिकाणी जीवनावश्यक वस्तू तसेच अन्नधान्याची टंचाई ला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत संघटनेचे तालुके,जिल्हे,राज्य पदाधिकारी शक्य होईल त्या ठिकाणी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करत आहेत.
कोरोना बाबतची माहिती, सुरुवातीस आढळून आलेल्या रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना वायरस असल्याचं सांगितलं.
कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे.
या नव्या कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचं विश्लेषण करण्यात आलं. कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचं संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात आढळलं आहे.
सार्स प्रकारातला कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. 2002 साली चीनमध्ये 8,098 लोकांना सार्स विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 774 लोकांचा मृत्यू झाला होता.
डोकेदुखी, नाक गळणे, खोकला, घसा खवखवणे, ताप, अस्वस्थ वाटणे, शिंका येणे, धाप लागणे, थकवा जाणवणे, न्युमोनिया,, फुप्फुसात सूज ही काही कोरोनाची लक्षणे आहेत.
हा विषाणू अजूनही नियंत्रणात आणता येईल,असं यापूर्वी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटलं होतं.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे सर्दी-खोकला अशी लक्षणं दिसतात. मात्र, लागण गंभीर असेल तर मृत्यूही ओढावू शकतो.
कोरोना हा विषाणुचा नवीन प्रकार आहे. हे प्राण्यांच्या एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संक्रमित होतात आणि त्यानंतर मानवालाही संसर्ग होतो. या संक्रमणावस्थेच्या काळात त्याचा शोध लागत नाही.
प्रा.वूलहाऊस यांच्या मते लोकसंख्येचं प्रमाण आणि त्याची घनता यामुळे चीममधले लोक लगेच प्राण्यांच्या संपर्कात येतात.
ते म्हणतात, “येणाऱ्या काळात चीनमध्येच पुन्हा असं काही ऐकायला मिळालं, तर त्यात आश्चर्य वाटणार नाही.”
या विषाणुची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला झाल्याची अनेक उदाहरणं समोर आल्याचं चीनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
कोरोना विषाणुग्रस्त रुग्णांची देखभाल करणाऱ्या अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही या विषाणुची लक्षणं दिसली आहेत,असंही त्यांनी सांगितलं.
या विषाणुविषयी चिंता वाटण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे या विषाणुमुळे सर्वांत आधी फुफ्फुसांवर परिणाम होतो. या विषाणुची लागण होताच व्यक्तीला खोकला सुरू होतो.
मात्र, सध्या जी आकडेवारी मिळते आहे तीच अंतिम असेल, असं आताच म्हणता येणार नाही.
या विषाणूचा परिणाम मर्यादित असेल,असं सुरुवातीला वाटलं होतं.मात्र, डिसेंबर नंतर अनेक प्रकरणं पुढे आली.
या संसर्गाची सुरुवात चीनमधल्या वुहान शहरातून झाली. मात्र, आता या विषाणुचा फैलाव चीनमध्यल्या इतर शहरात आणि चीनबाहेरही झालेला आहे.
थायलंड, जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियातही कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. वुहान शहरातून आलेले लोक कोरोनाग्रस्त असण्याची शक्यता जास्त आहे.
कोरोनाची लागण झालेल्या सर्वच लोकांची ओळख पटली आहे, असं गरजेचं नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
नवीन वर्षांत चीन फिरायला गेलेल्या अनेक पर्यटकांच्या माध्यमातून या विषाणूचा फैलाव चीनबाहेरील अनेक देशांमधल्या लाखो लोकांमध्ये झाला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांवर स्वतंत्र खोलीत उपचार सुरू आहेत, जेणेकरून इतरांना याचा संसर्ग होऊ नये. प्रवाशांना ताप आहे का, हे तपासण्यासाठी प्रवासी ये-जा करतात अशा सर्व ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय स्वच्छता राखता यावी आणि संसर्ग टाळवा, यासाठी सी-फूड मार्केट काही काळ बंद करण्यात आले आहेत.
या सर्व उपाययोजना केवळ चीनमध्ये करण्यात आल्या आहेत,असं नाही. चीनव्यतिरिक्त आशियातील इतर अनेक देश आणि अमेरिकेतही असेच खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत.
यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाने दिलेल्या वेळोवेळी सूचनांचे पालन करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे,असे पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.देवा तांबे यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button