Delhi

रेशनकार्ड संदर्भात नवीन नियम होतील लागू…आता “ह्या” लोकांना मिळणार नाही लाभ…

रेशनकार्ड संदर्भात नवीन नियम होतील लागू…आता “ह्या” लोकांना मिळणार नाही लाभ…

रेशन कार्डसंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने एक मोठा निर्णय घेतला असून शासकीय रेशन दुकानांमधून रेशन घेणाऱ्या पात्र लोकांसाठीचे नियम बदलण्यात आले आहेत.

श्रीमंत लोक आता घेऊ शकणार नाही लाभ

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानुसार सध्या देशभरातील 80 कोटी लोक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा (National Food Security Act-NFSA) लाभ घेत आहेत. परंतु यात जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ते देखील लाभ घेत आहेत.

काय आहे बदल..?

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या सहा महिन्यांपासून मानकांमधील बदलाबाबत सर्व राज्यांसोबत बैठक आयोजित केली जात आहे. राज्यांनी दिलेल्या सूचनांचा समावेश करून पात्रांसाठी नवीन मानके तयार केली जात आहेत. ही मानके या महिन्याच्या शेवटी पूर्ण होतील.

नवीन मानक लागू झाल्यानंतर फक्त पात्र व्यक्तींनाच लाभ मिळेल. अपात्र लोकांना लाभ मिळू शकणार नाही. ज्यामुळे अन्नाचा पुरवठा पात्र लोकांपर्यंत होऊ शकेल. ज्यामुळे गरजू लोकांना मदत मिळेल, गरजू लोकांना डोळ्यासमोर ठेवून हा बदल केला जात आहे.

एक राष्ट्र, एक रेशन कार्ड योजना

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या मते, आतापर्यंत ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड (ONORC) योजना’ 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डिसेंबर 2020 पर्यंत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे 69 कोटी लाभार्थी अर्थात NFSA अंतर्गत येणाऱ्या लोकसंख्येपैकी 86 टक्के लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. तर दर महिन्याला सुमारे 1.5 कोटी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन याचा लाभ घेत आहेत.

संबंधित लेख

Back to top button