नेहरू युवा केंद्र जळगाव चा वतीने हिंगोणा येथे स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोणा ता. यावल ( शब्बीर खान)
भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव यांच्या वतीने हिंगोणा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .सदर कार्यक्रमात 75 किलोग्रॅम प्लास्टिक पिशव्या वेस्टेज गोळा करून कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली त्याचबरोबर गावकर्यांना स्वच्चतेचे महत्व पटवून दिले व प्लास्टिक चा वापर कमी करून आपण कशा प्रकारे पर्यावरण रक्षण करू शकतो याबद्दल माहिती दिली.
स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम प्रसंगी हिंगोणा येथिल ग्रामपचायत सरपंच . ग्रामविकास अधिकारी . देवानंद सोनवणे. ग्रामस्थ निलेश ठाकुर शांताराम कोळी. प्रभाकर.सोनवणे,राकेश नेमाडे,सूर्यभान तायडे,रामा आदिवाले,राजूआदिवाले, अरमान तडवी,नितीन सावळे, उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे कामकाज नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर व लेखपाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका समन्वय पल्लवी तायडे ,तेजस पाटील ,डिंगमबर चौधरी यांनी पाहिले. त्यासबरोबर हिंगोणा येथील पत्रकार शब्बीर खान यांचे सहकार्य लाभले.
उपस्थित सर्वांचे डिंगमबर चौधरी यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.