सरसकट कर्जमुक्ती न देता सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली – आमदार गिरीश महाजन
नितीन माळे
जळगाव – शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे आश्वासन ठाकरे सरकारच फोल ठरलं आहे. सरकारने तुटपीजी फक्त २ लाख कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले असून सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे. फक्त २ लाखा पर्यत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळणार असून इतर ठिकाणी अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान ही मदत झालेले नुकसान पाहता तुटपूजी असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
सरकार स्थापन करताना हे शेतकऱ्याला समर्पित सरकार असल्याचा कांगावा करण्यात आला , सरकारने एक प्रकार शेतकऱ्यांची मोठी चेष्ठा केली असून नाममात्र झालेल्या कर्जमाफी मुळे शेतकऱ्याच्या जखमेवर फुंकर न घालता मिट चोळण्याचे काम करण्यात आले असल्याचे ठाकरे सरकारने २ लाखपर्यत कर्जमाफीचा घोषणेवर आमदार गिरीश महाजन यांनी टीका केली आहे.