Bollywood

Bollywood: अमिताभ बच्चन अजिबात रोमँटिक नाही…! जया बच्चन यांचा मोठा खुलासा..!

Bollywood: अमिताभ बच्चन अजिबात रोमँटिक नाही…! जया बच्चन यांचा मोठा खुलासा..!

मुंबई जया बच्चन यांच्याकडे आपण नेहमीच एक कणखर आणि सशक्त महिला म्हणून पाहिले आहे. पण त्यांना त्यांच्या खासगी आयुष्यात खूप काही सहन करावं लागलं. आम्ही तुम्हाला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असे खुलासे सांगणार आहोत, जे जया यांनी स्वतः सिमी ग्रेवाल यांच्या शोमध्ये केले होते.

जया बच्चन आज भलेही राजकारणात जास्त सक्रिय असतील, पण एक काळ असा होता जेव्हा त्या आपल्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होत्या. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या लिंकअपच्या अफवांमुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य धोक्यात आले होते. पण जया बच्चन ना स्वत:ला तुटल्या ना कुटुंबाला तुटू दिलं. सगळ्या गोष्टी अगदी धीराने घेत त्यांनी संसार सांभाळला आणि पुढे नेला. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचा प्रेमविवाह झाला होता. ते ‘एक नजर’ चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले आणि त्यानंतर १९७३ मध्ये त्यांनी लग्न केले. पण ज्या व्यक्तीसोबत जया यांनी संसार थाटला त्यांना ते कधी रोमँटिक वाटलेच नाही. खुद्द जया बच्चन यांनी सिमी ग्रेवाल यांच्या चॅट शोमध्ये हा खुलासा केला होता.

माझ्यासोबत ते रोमॅण्टिक नाही

सिमी ग्रेवाल यांनी जया बच्चन यांना अमिताभ बच्चन रोमँटिक आहेत का असे विचारले असता, बिग बींनी त्यास नकार दिला, तर जया म्हणाली, ‘माझ्यासोबत नाही.’ मग अमिताभ यांनी सिमी यांना विचारले की त्यांना रोमँटिक म्हणजे नक्की काय विचारायचे आहे? यानंतर सिमी यांनी समजावून सांगितलं. तेव्हा जया म्हणाल्या की रोमँटिक म्हणजे वाईन आणणे, फुले आणणे… हे सर्व. मात्र, त्यानंतर जया यांनी हे प्रकरण हाताळत अमिताभ खूप लाजाळू असल्याचे सांगितले होते.
जया बच्चन पुढे म्हणाल्या की, मला अमिताभ रोमँटिक वाटत नाही. निदान माझ्याशी तरी नाही. मग त्या म्हणाल्या, ‘कदाचित त्यांची गर्लफ्रेंड असती तर त्यांनी हे सगळं केलं असतं. (फुले आणणे, वाईन आणणे, रोमँटिक असणे), पण मला स्वतःला तसे वाटत नाही.
यानंतर सिमी ग्रेवाल यांनी जया यांना प्रश्न विचारतात की अमिताभ आणि त्या एकमेकांना डेट करताना तरी रोमँटिक होते का, तेव्हा अभिनेत्रीने धक्कादायक उत्तर दिले. जया म्हणाल्या की, त्या आणि अमिताभ डेट करताना एकमेकांशी फार कधी बोललेच नाहीत. यानंतर सिमी यांनी त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. यावर जया यांनी अतिशय सावधपणे उत्तर दिले की त्या आणि अमिताभ यांना फारसं बोलायलाच मिळायचं नाही. अमिताभ रोमान्सबद्दल म्हणाले होते की, हे सर्व वेळेचा अपव्यय आहे.
त्याचवेळी, दुसऱ्या एका मुलाखतीत जया बच्चन यांनी अमिताभ यांना पहिल्यांदा जेव्हा त्या भेटलेल्या तेव्हा खूप घाबरल्या असल्याचं सांगितलं. हे ऐकून बिग बींना धक्का बसला होता. जया म्हणाल्या होत्या की फक्त एक अमिताभच होते जो तिला आदेश देऊ शकत होते आणि त्या त्यांचा आदेश घ्यायच्याही. ‘लव्ह अॅट फर्स्ट साईट’ प्रमाणे बिग बींना पाहताच क्षणी जया त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. जया यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना कोणत्याही परिस्थितीत अमिताभसोबत राहायचे होते. त्यामुळे अमिताभ बच्चन जे काही म्हणायचे ते त्या आनंदाने मान्य करायच्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button