भारतीय श्रीधान्य सवशौधन केंद्रा तर्फे शेतकऱ्यांना माहिती
हुलसूर/प्रतिनिधी-महेश हुलसूरकर
हुलसूर येथील क्रषी वैज्ञानिक संगाप्पा बाबुराव चिल्लरग्गे यांनी हुलसूर येथील श्री जय हनुमान मंदिर वार्ड क्र.१ मध्ये रात्री सर्व शेतकऱ्यांना एकत्र घेऊन शेतामध्ये बारीक कडधान्य पौष्टिक आहार कशा पद्धतीने शेती करावी यासंदर्भात शेतकर्यासी संवाद साधला व मार्गदर्शन केले पहिली शेतकरी कावळी ज्वारी, भगर, राळे, असे पौष्टिक अन्न सेवन करीत होते व ताकद खूप होती पण आता मात्र फास्ट फूड तेलकट पदार्थ चपाती, भात असे खाण्याने ताकद कमी होत चालली आहे व विविध आजाराला बळी पडत आहेत त्यामुळे हुलसूर येथे भारतीय सवशौधन केंद्रा मार्फत येथील ३० शेतकऱ्यांना कावळी ज्वारी चे बि देण्यात आले व ते कशा पद्धतीने लावणी करावी व हेही यावेळी सांगितले यावेळी गावातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते.