Amalner

?️अमळनेर कट्टा…फिरत्या न्यायालयात 26 फौजदारी व 1 दिवाणी दावा निकाली..!

?️अमळनेर कट्टा…फिरत्या न्यायालयात 26 फौजदारी व 1 दिवाणी दावा निकाली..!

अमळनेर तालुक्यातील जानवे येथे झालेल्या फिरते न्यायालयात फौजदारी स्वरूपाच्या २६ व दिवाणी स्वरूपाचा एक दावा निकाली काढण्यात आला. विधी सेवा प्राधिकरण मुंबई व अंतर्गत विधी सेवा समिती अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने या फिरत्या न्यायालयाचे आयोजन करण्यात आले.
न्यायालयात सकाळी फिरत्या न्यायालयाच्या वाहनाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व्ही आर जोशी यांच्या हस्ते उदघाटन झाले. नंतर फिरते न्यायालय जानवे येथे नेण्यात आले. त्याठिकाणी अध्यक्ष न्या एस एस अग्रवाल यांनी ग्रामस्थांना फिरत्या न्यायालयाचे महत्व पटवून दिले.

लोकांचा वेळ पैसा वाचविण्या बरोबरच आपसातील वाद मिटवून नाते संबंध टिकावेत आपसात समझोता व्हावा यासाठी या न्यायालयाची स्थापना करण्यात
आल्याचे वकील संघाचे तालुकाध्यक्ष ऍड राकेश पाटील यांनी सांगितले. ऍड शैलेश ब्रम्हे यांनी देखील मार्गदर्शन केले.फिरत्या न्यायालयाचे कामकाज न्या अग्रवाल यांच्या समोर चालले. पंच म्हणून ऍड अनामिका महाजन , ऍड किरण पाटील , ऍड प्रदीप पाटील , ऍड गोपाळ सोनवणे यांनी काम पाहिले. यावेळी न्या कराडे , सरकारी अभियोक्ता किशोर बागुल, ऍड राजेंद्र चौधरी, जयेश पाटील,गटविकास अधिकारी एस. बी. सोनवणे , विस्तार अधिकारी अनिल राणे , हितेश चिंचोरे, ग्रामविकास अधिकारी के. आर. देसले, तलाठी, विलास पाटील इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button