Maharashtra

पुढील पाच दिवस पुन्हा पावसाचा धुमाकूळ..!ह्या जिल्ह्यांना दिला येलो अलर्ट ..!

पुढील पाच दिवस पुन्हा पावसाचा धुमाकूळ..!ह्या जिल्ह्यांना दिला येलो अलर्ट ..!

पुणे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे. यानंतर आज पुन्हा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दक्षिण कोकणासह घाट परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील पाचही दिवस राज्यात हीच परिस्थिती कायम राहणार आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेलं शाहीन चक्रीवादळ तीव्र झालं असून त्यानं ओमन देशाच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. चक्रीवादळ किनापट्टीवर धडकल्यापासून देशात अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलं आहे. पुनरागमन केलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

केरळजवळ अरबी समुद्रात एक नवीन संकट येत्या दोन दिवसात उद्भवण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत याठिकाणी हवेच्या कमी दाबाचा पट्टी सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस केरळ, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना या दहा जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे आकाशात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच लांबचा प्रवास टाळावा,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button