India

50 हजारापेक्षा अधिक रकमेचा चेक देताय..! RBI ने केले नवीन नियम लागू..! लोकांमध्ये नाराजी..!

50 हजारापेक्षा अधिक रकमेचा चेक देताय..! RBI ने केले नवीन नियम लागू..!लोकांमध्ये नाराजी..!रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ने नवीन नियम लागू करत ऑगस्ट 2020 मध्ये चेक ट्रान्झॅक्शन सिस्टम (CTS) साठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम जाहीर केली होती. या नियमानुसार, बँका ही सुविधा सर्व खातेधारकांना त्यांच्या इच्छेनुसार 50 हजार किंवा त्याहून अधिक रकमेच्या धनादेशासाठी लागू करू शकते.

ज्यांच्या कडे बचत बँक खात्यासाठी इंटरनेट बँकिंग सुविधा नाही आहे तर 50,000 रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे धनादेश देणे त्यांना त्रासदायक ठरू शकते. कारण बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) लागू करण्यास सुरुवात केलीय. जवळपास सर्व बँका 1 सप्टेंबरपासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करतील.

विशेष म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ऑगस्ट 2020 मध्ये चेक ट्रान्झॅक्शन सिस्टम (CTS) साठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम जाहीर केली होती. या नियमानुसार, बँका ही सुविधा सर्व खातेधारकांना त्यांच्या इच्छेनुसार 50 हजार किंवा त्याहून अधिक रकमेच्या धनादेशासाठी लागू करू शकते.

 

चेक पास होणार नाही

आरबीआयच्या या नियमानुसार, धनादेश देण्यापूर्वी तुम्हाला बँकेला याबद्दल माहिती द्यावी लागेल अन्यथा धनादेश स्वीकारला जाणार नाही. तुमचा चेक नाकारला जाईल. या नियमामुळे ज्येष्ठ नागरिक जे नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या सेवा वापरत नाहीत, त्यांच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात.

 

‘या’ बँकांनी सुरू केली अंमलबजावणी

अॅक्सिस बँकेसह काही बँकांनी 50 हजारांपेक्षा जास्त धनादेशांसाठी पीपीएस अनिवार्य केले आहेत. ज्या अंतर्गत ग्राहकांना नेट/मोबाईल बँकिंगद्वारे किंवा शाखेला भेट देऊन बँकेला चेक तपशील द्यावा लागेल. यात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), कोटक महिंद्रा बँकेने 50,000 रुपयांच्या वरील धनादेशांसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केली आहे. हा नियम लागू करण्याचा हेतू ग्राहकांची सुरक्षा आहे. ह्या प्रणाली मुळे चेक द्वारे होणारी फसवणूक थांबणार आहे.पण साधारण ,अशिक्षित खाते धारकांचा मात्र त्रास वाढला आहे.

संबंधित लेख

Back to top button