Aurangabad

‘ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणास प्राधान्य द्या’…

‘ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणास प्राधान्य द्या’…

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : ग्रामीण आरोग्य केंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी, दुरूस्ती यावर लक्ष देऊन ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाकडे लक्ष देण्याचे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील कोरोनाविषयक आढावा बैठकीत प्रशासनाला दिले. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी अद्ययावत रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवा-सुविधांसह ग्रामीण आरोग्य केंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णास सर्व उपचार मिळावेत यासाठी प्रस्तावित आहेत.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, बांधकाम सभापती किशोर गलांडे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपायुक्त अविनाश गोटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी तसेच आरोग्य यंत्रणेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णलय या विषयीचा सविस्तर आढावा संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी यावेळी सादर केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button