Korpana

गांधीनगर नदी घाटावर पुलाची निर्मिती करा! ग्रामस्थांची मागणी

गांधीनगर नदी घाटावर पुलाची निर्मिती करा! ग्रामस्थांची मागणी

मनोज गोरे कोपरना

चंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या, पैनगंगा नदीवरील गांधीनगर – तेजापुर नदी घाटावर पुलाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होते आहे. या नदीघाटावर सद्यस्थितीत पूल नसल्याने नागरिकांना नावे द्वारे जीव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. हा पूल झाल्यास जिल्ह्यातील कोरपना व यवतमाळ जिल्ह्यातील वणी व झरी जामणी तालुक्यातील गावे एकमेकाशी जोडली जाईल. दळणवळणाची सोय निर्माण होऊन वेळ व कमी अंतरात नागरिकांना जाणे-येणे सोपे होईल. तसेच या दुर्लक्षित भागाचा विकास होऊन औद्योगिक क्रांती नांदेल. गणेशपुर ते कोरपना पर्यंतचा थेट मार्ग सुलभ होईल.या अनुषंगाने चंद्रपूर – यवतमाळ जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग यांनी यासाठी ठोस पावले उचलावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button