Maharashtra

नविन मिटर बसविण्याची मोहिम आज पासून तूर्त बंद

नविन मिटर बसविण्याची मोहिम आज पासून तूर्त बंद 

नविन मिटर बसविण्याची मोहिम आज पासून तूर्त बंद

अमळनेर प्रतिनिधी-   विज मंडळातर्फे शहरात सरसकट बदलविण्यात येणारे नविन मिटर बसविण्याची मोहिम आज पासून तूर्त बंद करण्याचे आश्वासन  विज मंडळाचे अधिकारी किरण पाटील यांनी आ शिरिषदादा चौधरी मित्र मंडळाच्या पदाधिकारींना दिली   विज कंपनी मार्फत शहरात जे नवीन मीटर बसविले जात आहे .ते ऐच्छिक आहे ते गरज नसताना सुस्थितीतील मीटर देखील बदलविण्याचे काम कंपनी मार्फत केले जात आहे. नवीन मिटर अतिशय जास्त बिल देत असल्याने नागरिकांची मोठी लुट होणार आहे.
यामूळे नागरिकांचा रोष लक्षात घेवून आ शिरिष चौधरी गटाचे नगरसेवक बबली पाठक नियोजन मंडळाचे सदस्य पंकज चौधरी यांचे नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यां समवेत विज मंडळाच्या अधिकाऱ्यांना आज दि १५ रोजी सकाळी १२ वा.  निवेदन दिले अर्धा तास तर विज मंडळ कार्यालयात निवेदन घेण्यास कोणीच तयार नव्हते कार्यकर्त्यांचा आक्रोश व संताप अनावर होताच सहा. अभियंता किरण पाटील यांनी निवेदन स्विकारून तात्काळ सदर मोहिम तूर्त थांबविण्याची सूचना संबधित मिटर बदलविणाऱ्या एजन्सीला दिले शहरात नागरिकांनी जागृत राहून मिटर बसवणाऱ्यां ना स्पष्ट पणे नकार द्यावा असे आवाहन आ शिरिष चौधरी मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे यावेळी नगरसेवक सलीम शेख नरेंद्र चौधरी घनश्याम पाटील  भाऊसाहेब महाजन धनू महाजन बाळासाहेब संदानशिव नावेद शेख सूरेश चौधरी पप्पू चौधरी किरण बागूल , संतोष लोहेरे, गुलाब नबी,अखतर सैय्यद, महेश जाधव,सुरेश चौधरी, सोनू चौधरी, भूषण अहिरराव, यश अहिरराव, नारायण चौधरी आदि ऊपस्थीत होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button