Mumbai

Mumbai: अखेर ठरलं..10 वी 12 वी च्या परीक्षा ऑफलाईनच आणि ठरलेल्या दिवशीच…! पहा विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय…!

अखेर ठरलं..10 वी 12 वी च्या परीक्षा ऑफलाईनच..! पहा विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय…! वेळापत्रक आणि इतर महत्वाच्या गोष्टी…!

मुंबई राज्यातील 10 वी 12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार याबाबत महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. 12 वी च्या परीक्षा 4 ते 30 मार्च तर 10 वी 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणार आहेत.

विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ शकले नाहीत. ते विद्यार्थी लेखी परीक्षेनंतर ही परीक्षा देऊ शकणार आहेत. ५ एप्रिल ते २२ एप्रिल या काळात या परीक्षा होणार आहेत. १२वी साठी एकूण १५८ विषयांसाठी ३५६ प्रश्नपत्रिका आणि १० वीच्या ६० विषयांसाठी १५८ प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत.

शिक्षण मंडळाने ऑफलाईन परीक्षांची पूर्ण तयारी केली आहे. यासाठी पावणे दोन लाख कर्मचारी झटत आहेत. कोरोनाचा विचार करून आवश्यक काळजी घेतली जात असून झिग झॅक पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. जेथे शाळा तेथेच परीक्षा होणार आहे. यामुळे मुलांच्या मनातील भीती कमी होईल. त्यांना चांगले वातावरण मिळेल, असे शरद गोसावी यांनी सांगितले.

सकाळच्या सत्रातील परीक्षा १०.३० वाजता सुरु होणार आहे. तर, मुलांना १०.२० वाजता प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. तर, दुपारच्या सत्राची परीक्षा २.३० वाजता सुरु होईल आणि मुलांना प्रश्नपत्रिका २.२० वाजता देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने अर्धा तासाचा वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तसंच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च दरम्यान होणार असून १४ ते ३ मार्चदरम्यान श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होईल अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली आहे. अपरिहार्य कारण असेल तर विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव कमी झाला असल्याने ७० ते ८० गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार असून ४० ते ६० गुणांच्या पेपरला १५ मिनिटं अधिक वेळ दिला जाईल. करोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली तर ३१ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. तसंच १५ पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर जवळचं महाविद्यालय केंद्र असणार आहे.

महत्वाचं म्हणजे दहावी बारावीच्या परीक्षेसाठी करोना लस बंधनकारक नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

परीक्षेसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र/उपकेंद्र देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत तिथेच त्यांना लेखी परीक्षा देता येईल. यामुळे त्यांनी परीक्षा देताना परिचित वातावरण मिळेल आणि कमी प्रवास करावा लागेल असं शरद गोसावी यांनी सांगितलं आहे.

करोनामुळे अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली असल्याने लेखी परीक्षेचे आयोजन ७५ टक्के अभ्याक्रमावर करण्यात आलं आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येणार आहेत. शाळा तिथं परीक्षा केंद्र असून बहिस्थ नाही तर शाळेतील शिक्षकच सुपरव्हायझर असतील.

परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांना वैद्यकीय अडचण आल्यास केंद्रावर स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. करोनामुळे आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल. जर एखाद्या विद्यार्थ्यांला परीक्षेदरम्यान लक्षणं दिसली तर त्याला स्वतंत्र कक्षात परीक्षा देण्याची मुभा असेल. तसंच जवळच्या आरोग्य केंद्रामार्फेत परीक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवली जाईल.

दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक ते दीड तास आधी उपस्थित राहावं लागणार आहे. तसंच १० मिनिटं आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button