Amalner

प्रलंबित सानुग्रह अनुदानासाठी आमदारांच्या निवासस्थानी शेतकरी  उपोषण करणार …!बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी दिला इशारा..!आमदार साहेब आता तरी चूक सुधारा..!

प्रलंबित सानुग्रह अनुदानासाठी आमदारांच्या निवासस्थानी शेतकरी उपोषण करणार …!बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांनी दिला इशारा..!आमदार साहेब आता तरी चूक सुधारा..!

चोवीस महीने उलटल्यावरही 32 गावांचा अतिवृष्टीच्या सानुग्रह प्रश्न प्रलंबितच..
अतिवृष्टी अनुदान मिळेना बत्तीस गावातील वंचित शेतकरी करणार आमदारांच्या निवास्थानासमोर साखळी उपोषण !

अमळनेर मारवड मंडळासह वंचित शेतकरी बांधव आमदार अनिल पाटील यांच्या निवास्थानासमोर साखळी उपोषण करणार असल्याचे निवेदन आज ता.6 रोजी तहसीलदार मिलिंद कुमार वाघ ,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,नगरपालिका प्रशासन ,जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले आहे.सन 2019(जुलै व सप्टेंबर) मध्ये झालेल्या अतिवृष्टित मारवड मंडळासह तालुक्यातील 52 गावातील शेती पिकांना जबर फटका बसला होता. बाधीत 20 गावांना सानुग्रह प्राप्त झाला.मात्र अजूनही उर्वरित 32 गावे (सप्टेंबरमध्ये बाधीत)वंचित आहेत.याबाबत आज निवेदन देण्यात आले.यात म्हटले आहे की, ता.15 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर रोजी तीन दिवस वंचित शेतकरी सकाळी 11 ते 12 या दरम्यान साखळी उपोषण करतील.
सन 2019(जुलै व सप्टेंबर) मध्ये झालेल्या अतिवृष्टित मारवड मंडळासह तालुक्यातील 52 गावातील शेती पिकांना जबर फटका बसला होता. याबाबत सातत्याने पाठपुरावा व अनेक अडचणींचा सामना करत हेक्टरी 20 हजार 400 रूपये सानुग्रह मंजूर करण्यात यश मिळाले.

त्यांनतर जुलैमध्ये बाधीत 20 गावांना सानुग्रह प्राप्त झाला.मात्र अजूनही उर्वरित 32 गावे (सप्टेंबरमध्ये बाधीत)वंचित आहेत. याबाबत प्रांताधिकारी, आमदार, मंत्री महोदयांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात आधीच्या निधीच्या उपयोगिता प्रमाणपत्राला जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयुक्त कार्यालयाकडे उशिराने म्हणजे 26 मे रोजी पाठविण्यात आल्याने विलंब झाला. आयुक्त कार्यालयाने
जूनमध्ये मत्रांलयाकडे याबाबतचा अहवाल पाठवला. त्यानंतर हे प्रकरण
अर्थविभागाकडे प्रलंबित आहे. अर्थमंत्र्यांच्या टेबलवर हे प्रकरण असून त्यांची स्वाक्षरी झाली की, सानुग्रह मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.ह्या संदर्भात निवडून आलेल्या लोक प्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.मात्र, कोकणसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टिमुळे हाहाकार उडाला आहे. संपूर्ण मंत्रीमंडळ पूरग्रस्त भागाला भेटी देत आहेत. त्यामुळे गत दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टिमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकर्‍यांच्या सानुग्रहाचा प्रश्‍न अजून काही दिवस तरी सुटण्यासारखा नाही, अशीच चिन्हे दिसत आहेत. या पाश्वभूमिवर मारवड मंडळासह वंचित शेतकरी बांधव आमदार अनिल पाटील यांच्या निवास्थानासमोर साखळी उपोषण करणार असल्याचे निवेदन आज ता.6 रोजी तहसीलदार मिलिंद कुमार वाघ ,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,नगरपालिका प्रशासन ,जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले आहे.
मागील दोन वर्षांपासून अतिवृष्टिचा सानुग्रह मिळाला नसून या खरिपात पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवली असून कोरडा दुष्काळ आहे. जून ,जुलै,औगस्ट महिन्यात पाऊस न झाल्याने पीके वाया गेली.सदयस्थितित पाऊस होउनही खरीप हंगाम हातातून गेला.हजारो रूपयांचे बियाने ,खते यात खर्च झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.मात्र लोकप्रतिनिधी याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून साखली उपोषण बाबत ठाम असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी नायब तहसीलदार श्री.पवार अमळनेर यांना निवेदन देतांना मारवड परिसरातील शेतकरी श्यामकांत पाटील, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, मधुकर पाटील ,शरद साळुंखे, ज्ञानेश्वर पाटील ,अमोल पाटील बाबा सुर्वे ,भगवान पाटील, संदीप पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button