मुंबई – नागपूर महामार्गावर कंटेनर पलटी
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : मुंबई – नागपूर महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरू असून
वैजापूर तालुक्यातील गोळवाडी फाट्याजवळ हॉटेल तोरणगढ समोर रविवार दि १८ जूलै रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुंबई भिवंडी कडून औरंगाबाद मार्गे कलकत्त्याला जाणारा ट्रक मालवाहतूक कंटेनर चालकाने मोटारसायकल स्वराला वाचविण्याच्या प्रयत्नात पलटी झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की भिवंडी वरुन विविध प्रकारचे ट्रास्पोर्ट माल घेऊन जात असताना वैजापूर तालुक्यातील गोळवाडी येथे समोरच्या वाहणाने ओव्हरटेक केल्याने मोटर सायकल दुचाकीस्वाराला वाचवतांना ट्रक कंटेनर क्रमांक एच आर ५५ वाय ५४२६ हा ट्रक कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक ज्ञानेश्वर त्रिंबक कोंढ वय ३० रा कल्लाण मुंबई यास डोक्यात व शरीरावर मार लागल्याने गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच गावातील पोलीस पाटील देवका पवन भक्कम व कुलदीप ताजी यांनी वैजापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत. तसेच या ट्रकचा हौजींग पाईप निघाल्याने गाडी १५ ते २९ च्या वेगाने चालू होती अशी माहिती ट्रक चालकाने दिली आहे.