Mumbai

शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचे अर्थ सहाय्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचे अर्थ सहाय्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहुन अधिक क्षेत्रावरील शेती पिकांच नुकसान झाले या नैसर्गिक संकटामुळे बांधीत झालेल्या शेतरकऱ्यांना 10 हजार कोटीचे अर्थ सहाय्य आज मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले.
राज्यातल्या अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने 10 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली. त्यानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी तसेच पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले. एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपण मदत जाहीर केल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आले आहे
अशी असेल मदत

जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर

बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर

बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर

ही मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button