अमळनेर तालुका ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध करावी..भारतीय जनता पार्टीचे निवेदन
गेल्या महिन्याभरापासून अमळनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे उरल्या सुरल्या खरिप पिकांचे चिखल झाले आहे . झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळयातून अधुंचा पुर वाहु लागला आहे . अश्या संकटाच्या काळात बळी राजाला धिर देणे अत्यंत गरजेचे आहे . म्हणून अमळनेर तालुक्यात सर्वच पिकांचे १०० % नुकसान झाले असून पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा फार्स न करता पिकपेरा निहाय सरसकट मदत जाहिर करण्याचे आदेश दयावे . पावसामुळे मोठया प्रमाणात शेती पिकांची हानी झाली आहे . हजारो हेक्टर जमीनी पुरात खरडुन गेल्या . बहुतांश गांवानां शेतात पाणी तुडूंब भरुन हाता तोंडाशी आलेले कपाशी , ऊस , मका , ज्वारी , बाजरी , आदी सर्व पिके खराब झाली आहेत . अधिच मुंग , उडीद , सोयाबीन हातातुन गेलेली आहे . कापसावर लाल्या व बोंड काळी पडली आहेत . तसेच फुटलेल्या कपाशीला कोंब आले आहेत . त्यामुळे शेतकरी मोठया प्रमाणात सापडलेला आहे . यामुळे शेतकरी पुर्णपणे आर्थिक संकटात सापडलेला आहे . त्याला शासकिय मदती शिवाय आधार दिसत नाही . तरी महोदयांना विनंती की , सदर अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ शासनाकडून मदत मिळावी व जाहिर केलेला २५ % पिकविमा न देता १०० % पिकविमा जाहिर करुन सदर रक्कम शेतकन्यांना त्वरीत देण्यात यावी . या करीता आपल्या स्तरावरुन कार्यवाही करण्यात यावी . तात्काळ मदत जाहिर न झाल्यास दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकरीता अमळनेर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरुन तिव्र स्वरुपात अंदोलन करेल.