Pandharpur

अभिजीत पाटलांनी पंढरीत स्वखर्चाने उभारले DVPथेअटरमध्येच कोविड हॉस्पिटल

अभिजीत पाटलांनी पंढरीत स्वखर्चाने उभारले DVPथेअटरमध्येच कोविड हॉस्पिटल

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : सध्या राज्यभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दररोज हजारो रुग्ण सोलापूर जिल्ह्यात आढळून येत आहे.यात प्रामुख्याने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक व लक्षणीय आहे.कोरोनाग्रस्तांच्या या वाढत्या संख्येमुळे सध्या आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत असून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी रुग्णालयांची व बेडची कमतरता भासत आहे. अशा आणीबाणीच्या काळात तालुक्यातील सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर अशी ओळख असलेले धारशिव साखर कारखाना चेअरमन अभिजीत पाटील यांनी माणुसकी जपत स्वतःच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये स्वखर्चाने कोविड हॉस्पिटल उभारून चक्क ५० रुग्णांच्या उपचारासाठी सोय उपलब्ध करून देत आहेत.
यामध्ये ५० बेडला ॲक्सिजनची सोय आसेल, मेडिकल, लॅब, तज्ञ डॅाक्टर कडुन उपचार, २४ तास डॅाक्टर्स, नर्स, स्वच्छता, पेशन्ट जेवनाची सोय सर्व सोयीचा हजारो लोकांना याचा फायदा होणार आहे.
सध्या ह्या दोन्ही तालुक्यात कोरोनामुळे स्थिती गंभीर बनली आहे.आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने अनेक रुग्णांना ऑक्सिजनचे हॅास्पिटल उपलब्ध होत नसल्याने दगावत आहेत.त्यामुळे तातडीने उपचारासाठी अधिक रुग्णालये उभारणीची गरज निर्माण झाली असताना अभिजीत पाटील यांनी त्यांच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये कोविड रुग्णालय उभारून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.गतवर्षीच्या कोरोनाच्या सुरवातीच्या काळापासून सर्वप्रकारची मदत करत अभिजीत पाटील यांनी आपले सामाजिक भान जपले आहे. गेल्या वर्षात कोरोनाकाळात पोलीस,आरोग्य कर्मचारी,तसेच पत्रकार बांधवांना हजारो कोरोना योध्यांना मोफत जेवण,विविध गरजू घटकांना वस्तू वाटप केले.घरोघरी जाऊन थर्मल स्कॅनिंग करीत होते,मुख्यमंत्री सहाय्यता निधी यासह अनेक प्रकारे अभिजीत पाटील यांनी मदत केली आहे. तसेच दोनच दिवसांपूर्वी रुग्णालयांची ऑक्सिजन कमतरता भरून काढण्यासाठी आपल्या साखर कारखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिल्या पायलट ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची घोषणा केली आहे.त्यासोबतच त्यांनी कोविड हॉस्पिटलची निर्मिती करून हजारो गोरगरीब लोकांना अशा अडचणीच्या काळात मोठा आधार दिल्याने व कोणत्याही पक्षात सामील नसताना व कोणताही मोठा राजकिय वरदहस्त नसताना केवळ लोकसेवेसाठी त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“आम्हाला बेड मिळेल का? म्हणून दररोज अनेकजण भेटायला येतात तसेच अनेकांचे कॉल येतात.सोलापूर जिल्हा व जिल्हा बाहेरील हाॅस्पिटलांशी संपर्क करून शक्य तितक्या रुग्णालयांची बेडची व्यवस्था करून देतोय. मात्र वाढत्या रुग्ण संख्येमुळे यंत्रणा अपुरी पडत असल्याने सर्वांना बेड मिळणे शक्य नाही. त्यातून होणारी गरजू व गरिबांची तडफड पाहवत नव्हती.याच जाणिवेतून आपण काही लोकांचे प्राण वाचवू शकतो.यासाठी मी हे रुग्णालय सुरू करून लोकांच्या सेवेत समर्पित करत आहे. आपल्याला शक्य असेल तेवढी मदत सर्वांनी करायला अशा काळात करणे गरजेचे आहे.”

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button