Chandwad

समस्याग्रस्त नागरिकांचे चांदवड नगरपरिषदेला स्मरणपत्र

समस्याग्रस्त नागरिकांचे चांदवड नगरपरिषदेला स्मरणपत्र

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड नगरपरिषदेला मे महिन्यात चांदवड शहर भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व काही सामाजिक कार्यकर्ते यांनी शहरातील विविध समस्यांबाबत निवेदन दिले होते.मात्र यात काहीच कार्यवाही न झाल्याने आज पुन्हा स्मरणपत्र देण्याची वेळ नागरिकांवर आली.शहरातील खालील समस्या तातडीने सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यात प्रामुख्याने घंटागाडी दररोज येणे अपेक्षित आहे.पाणीपुरवठा 3 ते 4 दिवसाआड होणे आवश्यक आहे.गटारींची साफसफाई होणे आवश्यक आहे.रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या बाभळी तोडणे गरजेचे आहे.मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, शहरात जंतुनाशक फवारणी करावी अश्या विविध समस्या मांडलेल्या आहेत.यावेळी महेंद्र कर्डिले , अंकुर कासलीवाल, मुकेश आहेर, संजय चोबे , किशोर क्षत्रिय, महेश बोऱ्हाडे ,प्रशांत दळवी, संकेत वानखेडे, वैभव जाधव आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button